धर्माबाद ( बहिष्कृत भारत वार्ताहर) ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट अशी म्हण आहे या आधुनिक युगात काही मुलं आई-वडिलांनी जन्म देऊन, त्यांचे पालन पोषण करून, त्यांना नोकरी लावून, समाजात प्रतिष्ठा निर्माण करून दिली तरीही आपल्या आई-वडिलांचे ऋण फेडण्याची त्यांची तयारी नसते अशी बिघडलेली मुलं जर आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील तर आई-वडिलांच्या नावे असलेली संपत्ती मुलांच्या नावे न करण्याचा किंवा वारसा देणे बंद करण्याचा ठराव बेल गुजरी हरेगाव गट ग्रामपंचायतने ग्रामसभेत घेतला आहे. या ठरावामुळे बिघडलेली मुलं आता कामाला लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामविकास अधिकारी सविता निदान कर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून अंकुश दत्ताहरी नरवाडे बेलगुजरी यांची तर तंटामुक्ती उपाध्यक्ष म्हणून तानाजी रामचंद्र शिंदे हरेगावकर निवड करून पुष्पहार देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.या ग्रामसभेस मारुती वकलवाड, गणपतराव नरवाडे यांनी ठराव मांडला. लक्ष्मणराव शिंदे, माधवराव कदम, नारायण भोकरे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.