लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी विद्यार्थी पालक संवाद मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कमलाकर कणसे, प्रमुख पाहुणे यशवंत महाविद्यालय नांदेड येथील उपप्राचार्य कबीर रबडे सर, धर्माबाद शिक्षण संस्थेचे सहसचिव वर्णी नागभूषण तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉ योगेश जोशी, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य अमृतराव वानखेडे आधी मानेवरांचे प्राध्यापक डॉ दुर्गाप्रसाद रांदड सर यांनी शाल पुष्पहार देऊन स्वागत केले केले आहे सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्राध्यापक रबडे सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी व पालक आणी शिक्षक यांना संवाद साधताना मोबाईलचा वापर करु नका मोबाईल पेक्षा व्यायाम महत्त्वाचा असतो कारण आभ्यासाला शरीर साथ देते व ट्यूशन पेक्षा घरी अभ्यास केलेले बरे सेल्फ स्टडी चा अधिक फायदा असतो असा मुलांना व पालकांना मोलाचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे या स्पर्धेच्या युगात कोणत्याही प्रकारे अडचण आल्यास मी मार्गदर्शन करायला कधीही तयार आहे असे आवाहन त्यांनी केले आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कमलाकर कणसे सर यांनी विद्यार्थी पालक संवाद मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना म्हणाले की महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना जे काही महत्त्वपूर्ण सुविधा द्यायचे ते देण्याचे आम्ही ठरवले आहे त्रिवेणी संगम असणे महत्त्वाचे आहे विद्यार्थी पालक शिक्षक यांचा मेळ हवा असल्याचे त्यांनी या कार्यक्रमांमध्ये संबोधित केले आहे लवकरच बारावीचे अभ्यासक्रम चालू होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे व तसेच जेईई व नीट च्या अभ्यासक्रमाचे क्लासेस आणी एम सी क्यू टेस्ट घेणार असल्याची माहिती विद्यार्थी व पालक पालक यांना देण्यात आली आहे पालक वर्गातून पत्रकार किशन कांबळे यांनी विद्यार्थांना पालकांच्या वतिने कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना महाविद्यालय, विद्यार्थ्यांची उपस्थिती, व गुणवत्ता, याविषयी माहिती देताना मागील चार ते पाच वर्षापासून एच एस सी बोर्डातून मुलींचा प्रथम क्रमांक येत आहे जर यावर्षी आपल्या महाविद्यालयातील मुलांचा प्रथम क्रमांक मिळाला तर माझ्या वतीने 5000 रुपयाचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे. पालक मेळाव्यात विद्यार्थी, विद्यार्थींनी,पालकांची बहुसंख्य परिस्थिती होती कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक सचिन शिंदे सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. अरविंद बोधनकर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रा. शेख रहिमुद्दीन, प्रा. अविनाश कुलकर्णी, प्रा. डॉ सुषमा पल्लेवाड, प्रा. डॉ. बालाजी शिरगिरे प्रा. सतीश गर्दसवार, प्रा. नारायण वाडीयार, , प्रा . माधव शिवशेट्टे, प्रा. जिडगे सर, प्रा. बाळासाहेब काळे , प्रा. सुधाकर कासरलावाड, तसेच नारायण आडेराव, संजय जाधव, रमेश कनकमवाड,शैलेश वाघमारे, सुरेश भद्रे , मारोती जगदंबे यांनी सहकार्य केले आहे.