धर्माबाद शहरात अंतर्गत मार्केट यार्ड ते आंध्र बस स्टॅन्ड पर्यंत मुख्य रस्ता अतिशय अरुंद आहे . हा मुख्य रस्ता अरुंद असल्याने सततची वाहतूक कोंडी शहराच्या नशिबी असून नगरपालिका व वाहतूक पोलीस विभाग हतबल झाले आहेत.
शहरातील वर्दळीचे व गर्दीचे ठिकाण असलेले नेहरू चौक, पानसरे चौक, मुख्य बाजारपेठा आदी ठिकाणच्या रस्ते फुटपाथवर दुकानदार अतिक्रमण करून साहित्य विक्रीला ठेवत आहेत. तर दुकानासमोरील फुटपाथच्या पुढे ग्राहकांना दुकानात येण्या-जाण्यासाठी सर्रासपणे लोखंडी जाळी लावली जात आहेत. तसेच रस्त्याच्या एका नव्हेतर, दोन्ही बाजूला बाईकची पार्किंग केली जाते आहे. यावर नगरपलिकेने व वाहतूक विभागाने कारवाईचा हातोडा उगारून सुद्धा” जैसे थे ” स्थिती आहे.
तसेच शहराच्या मुख्य रस्त्यावर फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाड्यांची संख्या वाढली असून हे व्यवसायिक आपला हातगाडा घेऊन सतत रस्त्यावरून फिरत असल्याने वाहतूक कोंडीमध्ये आणखीच भर पडत आहे.
पोलिसांनी वाहतुकीला कितीही शिस्त लावण्याचे प्रयत्न केले तरीही कोंडी सुटेल याची शाश्वती नसल्याने यापुढे तरी नगरपालिका व प्रशासन