महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. २२ ते २८ जुलै दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळी ( ध) (केंद्र- रत्नाळी) येथे आयोजित केला होता. त्या शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली असून प्रत्येक दिवशी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक पीए. हिवराळे सर यांनी दिली.
या सप्ताहात पाण्याचे महत्व,इतरांना कशी मदत करावी .या सारखे पोस्टर्स तयार करण्यात आले .याशिवाय मैदानी,तसेच शारीरिक व डिजिटल स्वरुपाचे खेळ,बोर्ड गेम्स,भिंतीवरील तक्ते,वाचनकट्टा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्रे ,माहिती ट्रॅकरवर अपलोड करण्यात आली आहे .या माध्यमातून लोकगीते आणि लोकनृत्य तसेच लोकसंगीताचे शाळेतील मुलांनी सादरीकरण केले.
इको -club माध्यमातून पर्यावरण संरक्षण व वृक्षारोपण आदी उपक्रमाचे शाळेच्या शिक्षिका श्रीमती.जे.पी. व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले.दि.28 रोजी या शिक्षण
सप्ताहाची सांगता झाली असून शाळेचे माजी विद्यार्थी पञकार लक्ष्मण पाटील सूर्यवंशी यांनी शाळेतील सर्व विद्यार्थीत्यानां
स्नेहभोजना करिता योगदान दिले.यावेळी गावातील धर्मीक कार्यात अग्रेसर राहणारे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर केरबा पाटील कदम,बळवंत पा.कदम, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती मंदाकिनी कदम,श्रीमती शोभाताई कदम. यांची उपस्थिती होती. शाळेत
शिक्षण सप्ताहा यशस्वी करण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष संतोष पा. कदम यांनी सहकार्य केले.