बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांनी आईसाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयुष्य पणाला लावले.आणी स्वराज्य निर्माण केले. तसेच आजच्या तरुणांनी देखील आपले आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घेणे म्हणजेच शिवविचार आचरणात आणणे आहे. आजचे तरुणांची हातात कडे, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात राजमुद्रा घालण्याची फॅशन आली आहे. पण ती ‘पॅशन’झाली पाहिजे. माती म्हणजे मातृभूमी आणि माता म्हणजे आई यांच्याशी इमान राखणे हा खरा शिव विचार आहे, त्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.