बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
श्री शिवाजी हायस्कूल इसोली ता चिखली जि. बुलढाणा येथे दि. 20/2 /23 ला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. जाधव सर तर प्रमुख उपस्थितीमध्ये हि.रा गवई व जी.बी मेरतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ,दलित मित्र समाज भूषण पंढरीनाथ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रतिमापूजनानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर नववीतील विद्यार्थिनी भक्ती लांडे ,निकिता गवई, वैष्णवी खंडागळे ,साक्षी बारहाते ,मीरा पानसंबळ ,वैष्णवी मुळे यांनी मार्च 2023 ला दहावीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. तर दहावीच्या विद्यार्थ्यांमधून भक्ती भागवत, वैष्णवी खरात ,प्राजक्ता घनघाव, धनश्री कोकाटे, वैष्णवी गवई या विद्यार्थिनींनी आपल्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून शाळेचे व सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त करत सर्व शिक्षकांचे आभार मानले. तर पूनम वाकळे या विद्यार्थिनीने वर्गशिक्षक गवई सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडत असताना आपल्या कवितेतून शिक्षक असावा असा जो शिवतो विद्यार्थ्याचा फाटलेला खिसा ही कविता सादर करून सर्व वातावरण भावनिक केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हि रा गवई सर हे विद्यार्थ्यांशी बोलत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या आई-वडिलांची प्रामाणिक रहावं असा महत्त्वाचा संदेश दिला. भक्ती भागवत,प्रीतल गवई, वैष्णवी गवई, श्रद्धा गवई, कोमल गवई, पूनम गवई पायल गवई, वैष्णवी गवई या विद्यार्थिनींनी वर्गशिक्षक व शाळेसाठी वेगवेगळ्या भेट वस्तू दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस एस जाधव यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्च 2023 ची इयत्ता दहावीची परीक्षा कॉपीमुक्त असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करू नये असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जी बी मेरतकर यांच्या नियोजनाने व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या परिश्रमाने हा निरोप समारंभाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.