धर्माबाद ( वार्ताहर) तालुक्यातील बाभळी ( ध ) गोदावरी नदी पुलावरून
पूजेचे साहित्य टाकताना, अचानक तोल गेल्याने एका नवविवाहित महिलेचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.ही घटना दि.१५ जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
बिलोली तालुक्यातील चिरली येथील कृष्णा ढगे व निकिता ढगे हे दाम्पत्य बासर येथे देवदर्शनासाठी मोटरसायकल वरून जात असताना बाभळी ( ध) गोदावरी नदी पुलावर थांबून पूजेचे साहित्य नदी पुलावरून नदीपात्रात टाकत असताना निकिता ढगे हीचा अचानक तोल जाऊन नदीपात्रात पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जवळच असलेल्या कुंडलवाडी पोलिस ठाण्याला घटनेची माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने निकिता हिचा नदीपात्रात शोध घेतला.तब्बल तीन तासांनंतर निकिता हिचा मृतदेह आढळून आला.या प्रकरणी मयत निकिताचे पती कृष्णा ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र.६/२०२४ कलम १७४ सीआरपीसी अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शंकर चव्हाण हे करीत आहेत.
- विशेष बाभळी ( ध) गोदावरी नदी पुल उंचावर आहे व नदीपात्रात पाणी भरपूर आहे.विशेष
पुलावरील दोन्ही बाजुने कठडे नाहीत, ये जा करणा-या काही वाहतूक चालकांना भीती वाटते, एवढेच नसुन दोन्ही बाजुने कठडे नसल्याने त्याठिकाणी भीती वाटते अशी तक्रार दिल्यानंतर संबंधित अधिकारी दुर्लक्ष केले आहेत. गोदावरी नदी वर कठडे असते तर कठडेला हात लावुन जिव वाचला असता पण,कठडे नसल्याने पुलावरून तोल गेला, हाताला धरायला काहीच नव्हते, म्हणून मृत्यू झाला असे बोलले जात आहे.