बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस स्टेशन हिवखेड ता. खामगाव हद्दीमधील ग्राम चिचपुर शिवारातील गट क्रमांक २७९,२८० मध्ये दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता मोहम्मद खॉ तुराबखॉ ,शे कसम शे जान मोहम्मद ,शरीफाबी तुराबखॉ ,शकीलाबी अल्यारखॉ हे राहणार चिंचपुर येथील शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेले असता.आरोपी शेतीच्या वादातुन १) से मुक्तार से. सैद् २) सै. मुश्ताक सै. मुक्तार ३) से. सलमान सै. मुक्तार ४) से. राजु से. रज्जाक सर्व रा. चिंचपुर ता – खामगांव ५ ) कलीमखाँ सत्तारखाँ ६) रशीद खाँ सत्तारखाँ ७) बशीरखों सत्तारखॉ रा. मेहकर यांनी फिर्यादी यांचे शेतीचा जबरदस्तीने ताबा घेण्याकरीता मोहम्मद खाँ तुराबखा, शेख कासम शेख जान मोहम्मद, शरीफाबी तुराबखाँ, शकीलाबी अल्यारखाँ यांचे अंगावर मिरची पावडर फेकुन लाटया काटयांनी, चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी करुन मोहम्मद खाँ तुराबखा, शेख कासम शेख जान मोहम्मद यांना जिवाने ठार मारले आहे. सदर प्रकरणात फिर्यादी शेख जावेद खान अल्यारखॉ रा. चिचपुर ता. खामगाव यांच्या रिपोर्टवरुन अपराध क्रमांक ११४/२०२३ कलम ३०२, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १२०ब भादंवि प्रमाणे आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.नमुद गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद ठाकरे यांच्याकडुन सुचना प्राप्त झालेवरुन त्वरीत पोलीस स्टेशन स्तरावर पथक गठीत करुन आरोपीतांचा शोध घेण्यात आला. सदर गुन्हयातील एकुन पाच आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गजानन वाघ पोलीस स्टेशन हिवरखेड हे करीत आहेत. सदया स्थितीत पेरणीचा हंगाम असल्याने शेतीचे वाद उदभवण्याची शक्यता असल्याने शेतीच्या वादातुन टोकाची भुमीका न घेता आपले मुलाबाळांचे भविष्याचे विचार करुन जातीय सलोखा व सामाजीक दृष्टीकोन बाळगुन शेतीचा वादाबाबत कायदेशीर प्रक्रीयेचा अवलंब करावा. जेणेकरुन कोणतीही जिवीतहाणी होणार नाही. याची दक्षता घ्यावी.असे आवाहन हिवरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांनी केले आहे.